सोमवार, २२ ऑगस्ट, २०१६

गळती रोखण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याने टेमघर धरणाचा पाणीसाठा कायमस्वरूपी कमी करण्याची शक्यता

टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरल्याने ते अतिशय अतिधोकादायक झाले असून संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणामध्ये कायमस्वरुपी क्षमतेपेक्षा एक ते दीड टीएमसी कमी  इतका पाणीसाठा ठेवण्यात येणार असल्याचे समजते. धरणाची क्षमता ३.८१ टीएमसी असून पाणी साठा कमी करण्याचा निर्णय घेतल्यास तत्यात २.३१ ते २.८१ इतका पाणी साठा केला जाईल. मात्र हा निर्णय शासन जाहीर करणार की गुपचुपपणे त्याची अमलबजावणी करणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.


photo courtsey www.cambridgeblog.org


पुणे पाटबंधारे प्रकल्पाचे विद्यमान मुख्य अभियंता आणि तत्कालीन अधिक्षक अभियंता ईश्वर चौधरी यांनी चेन्नई येथे पार पडलेल्या पहिल्या धरण सुरक्षा परिषदेमध्ये सादर केलेल्या तांत्रिक अहवालामध्ये धरणाची गळती त्याच्या बांधणीपासून सुरू असून साठवण क्षमता वाढवल्यापासून त्यात वाढ होत आहे (Leakages in dam are observed from the time of construction in increasing trend with increase in reservoir storage level तसेच आधीची काही ठिकाणची गळती रोखली किंवा कमी झाली असली तरी गळती पाणी दुरुस्तीच्या ठिकाणांच्या खालून मार्ग काढत असून तीच्या जागा सरकत आहेत  ( lt is observed that the earlier prominent leakages has been stopped or lessened at the location of treatment. However water is finding way out above or below treated area. Only leakage spot are shifted from one location to another) असे म्हटले होते.या पार्श्वभुमीवर आता गळती रोखण्याच्या प्रयत्नांना कितपत यश येईल याबाबत शंका असल्याने धरणात कायमस्वरूपी क्षमतेपेक्षा एक ते दीड टक्का कमी पाणीसाठा ठेवला जाणार असल्याचे समजते.


शासनाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार टेमघर धरणाचे धरणाचे काम सन २००० मध्ये पूर्ण झाले. . मात्र, बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने  तेंव्हापासूनच पाण्याची गळती सुरू झाली तेंव्हा  गळतीचे प्रमाण ७२  लिटर प्रतिसेकंद असताना ते वर्षानुवर्षे वाढतच गेले.त्यानंतर २००९ - २०१० च्या सुमारास धरणाची क्षमता वाढवण्यात आली.आता प्रश्न आहे तो धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे हे लक्षात आले असतानाही त्याची क्षमता का वाढवण्यात आली ? चौधरी यांच्या अहवालानुसार २०१२ मध्ये ही गळती ६०२ लिटर प्रती सेकंद इतकी होती. दुरुस्तीनंतर ती ३०६ लिटर प्रती सेकंद इतकी कमी झाली आणि पुढच्या वर्षी ती ३९० लिटर प्रतीसेकंद इतकी वाढली. हा आकडा प्रचंड मोठा आहे.याचाच अर्थ धरणामध्ये केलेल्या दुरुस्तीचा फारसा उपयोग होत नाही.आणि आता तर ही गळती पुन्हा ६०० लिटर प्रती सेकंद या दरावर येउन ठेपली आहे.

टेमघर धरणाचे बांधकाम युती शासनाच्या काळात म्हणजे १९९७ मध्ये सुरू झाले. सेंट्रल वॉटर कमिशन कडे राज्य शासनाने दिलेल्या अधिकृत नोंदी नुसार २००० साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. सुरुवातीला धरणाच्या बांधकामाचे  श्रीनिवास  कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र त्या कंपनीने बोगस कागदपत्रे दिल्याने दुस-या कंपनीने म्हणजे प्रोग्रेसिव कन्स्ट्रक्शन कंपनीने त्याला हरकत घेतली. परंतु श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नाही किंवा त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले नाही. उलट धरणाचे काम दोन्ही कंपन्यांना विभागून देण्यात आले.आश्चर्य म्हणजे निविदा प्रक्रियेत सामील असलेल्या तिस-या कंपनीचे म्हणजे नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्टर्सची निविदा उघडण्यात आली नाही.

त्यानंतर या धरणाच्या बाबतीत अनेक घडामोडी घडल्या युती शासनाच्या काळात म्हणजे १९९७ साली सुरू झालेल्या या धरणाच्या बांधकामाचे , त्यातील घोटाळ्यांचे कवित्व अद्याप सुरू आहे.आणि ते थांबण्याची चिन्हे नाहीत.सदर प्रकरणात कुणाला दोषी धरायचे, कुणावर कारवाई करायची आणि कुणावर नाही याची व्यूहरचना आधीच केली गेली असल्याने कोणत्याही तांत्रिक पेपरमध्ये किंवा चौकशी अहवालात ख-या दोषींचा उल्लेख नाही. त्यामुळे आता चौकशी आणि कारवाईचे केवळ नाटक रंगवले जात असून ख-या दोषींवर कारवाई होण्याची शक्यता नाही.

Related Stories


Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis


RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.


RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199
Website – http://surajya.org/




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा